Friday, April 19, 2024

‘आनंदा’ची बातमी! राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘आनंद’ चित्रपटाचा बनणार रिमेक

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘आनंद’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांकडून खूप पसंत केला गेला होता. हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. ‘आनंद’ चित्रपट आजही लोकं तितक्याच आवडीने पाहतात. अशातच, या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता या चित्रपटाचा रिमेक होणार आहे. चित्रपट निर्माते एनसी सिप्पी आणि विक्रम खाखर यांचा नातू समीर राज सिप्पी रिमेकसाठी तयारी करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार स्क्रिप्टिंगला अंतिम रूप देत आहेत.

साल १९७१च्या या चित्रपटात राजेश खन्ना हे कॅन्सरग्रस्त आनंद सहगलच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. ज्यांच्यावर अमिताभ बच्चन उपचार करत होते. पण शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरमुळे राजेश खन्ना जीवनाच्या लढाईत हरतात आणि मरण पावतात. ‘आनंद’मधील राजेश खन्ना यांचा अभिनय आणि त्यातील डायलॉग्स आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. चित्रपटाचे दमदार डायलॉग्स गुलजार यांनी लिहिले होते, जे आजही हिट आहेत. (amitabh bachchan rajesh khanna anand gets a remake of anand movie)

निर्माते समीर राज सिप्पी म्हणाले की, “अशा कथा नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे मला वाटते. तरुणाईला सिनेमाचा वारसा दाखवायला हवा.” पुढे ते म्हणाले, “मूळ चित्रपटाशी जोडलेल्या संवेदना आणि भावना लक्षात घेऊन, मला वाटते की आजच्या पिढीला अनेक कथा पुन्हा सांगण्याची गरज आहे, ज्या आजच्या काळात अतिशय समर्पक आहेत.”

दुसरीकडे, चित्रपटाशी संबंधित माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. समीर राज सिप्पी आणि विक्रम खाखर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग लास्ट स्टेजवर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा