Saturday, April 20, 2024

नो टेन्शन! बालपणीच्या मैत्रिणीवरच जडला ‘या’ बॉलीवूड स्टार्सचा जीव,आज करतायत सुखी संसार

वरुण धवनने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि आपल्या हॅंडसम लुकमुळे लोकांना वेड लावले होते. आता बातमी अशी आहे की वरुण धवन येत्या २४ जानेवारी रोजी त्याची बालमैत्रिण नताशा दलालशी लग्न करणार आहे. वरुणचे चाहते यामुळे त्याच्यासाठी खूप खुश आहेत. वरुण व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये असे बरेच सेलेब्स आहेत ज्यांना त्यांच्या बालमित्रासोबतच प्रेम केलं आणि पुढे जाऊन लग्न देखील केलं. चला तर मग आज आपण अशा सेलेब्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्याला मैत्रीतच खरं प्रेम सापडलं आणि ते एकमेकांचे आयुष्यभराचे साथीदार बनले.

शाहरुख खान- गौरी खान

बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खान पौगंडवस्थेतच गौरीच्या प्रेमात पडला. १९८४ मध्ये जेव्हा पंचशील क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीत शाहरुखने गौरीला पाहिले तेव्हा शाहरुख अवघ्या १९ वर्षांचा होता आणि गौरी १४ वर्षांची होती. तिला पाहताक्षणी शाहरुखला समजलं होतं की त्याचं हृदय आता त्याचं राहिलेलं नाही तर ते गौरीच झालं आहे. शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू असल्याने लग्न करणं सोपं नव्हतं. परंतु खर्‍या प्रेमासमोर प्रत्येकजण नमतं घेतो. अशा परिस्थितीत बर्‍याच चढ-उतारानंतर शाहरुख आणि गौरीचे १९९१ साली लग्न झालं आणि आता ते तीन मुलांचे पालक आहेत.

आयुष्मान खुराना – ताहिरा कश्यप

अनोख्या विषयांवर चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या बालपणीची मैत्री ताहिराला त्याची जीवनसाथी बनवलं. आयुष्मानला जेव्हा ताहिराला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती १६ वर्षांची होती. दोघांचे कुटुंब एकमेकांना ओळखत होते त्यामुळे आयुष्मान आणि ताहिराच्या भेटी गाठी होत असत. पहिल्या भेटीच्या १२ वर्षांनंतर आयुष्मानने ताहिराशी लग्न केलं. आज ते दोघेही दोन मुलांचे आई- बाबा झाले आहेत आणि ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहेत.

हृतिक रोशन-सुझान खान

आज हृतिक आणि सुझान जरी वेगळे झालेले असतील पण एक वेळ अशी आली होती की दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. ट्रॅफिक सिग्नलवर हृतिक आणि सुझानने एकमेकांना पाहिलं आणि प्रेमातच पडले. हृतिक आणि सुझान दोघेहीन सिनेमाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांना ओळखत होते. हृतिक सुझानच्या प्रेमात वेडा झाला होता. उदय चोप्राला मनातलं सांगून त्याने पुढे गोष्टी सरकवल्या. २० डिसेंबर २००० रोजी हृतिकने सुझानशी लग्न केलं. परंतु, २०१४ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेत एकमेकांपासून दूर राहणं पसंत केलं.

इमरान – अवंतिका

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला इमरान खान आता बॉलिवूडपासून दूर आहे. परंतु, तो आपल्या लग्नाच्या बातमीसंदर्भात बर्‍याच वेळा माध्यमांमध्ये चर्चेत असायचा. २०११ मध्ये इम्रानने त्याच्या बालपणीची मैत्रीण अवंतिका मलिकशी लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघांनीही १० वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. दोघांनाही इमारा नावाची मुलगी असून तीचा जन्म २०१४ मध्ये झाला होता.

हे देखील वाचा