Saturday, April 20, 2024

शूटिंगच्या सेटवर घडलेल्या ‘त्या’ घटनेने बदलले नर्गिसचे जीवन; राज कपूरला सोडून अभिनेत्रीने बांधली सुनील दत्तशी लग्नगाठ

चित्रपटातील कलाकारांना शूटिंगच्या सेटवर प्रेम होणे ही सामान्य गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना चित्रपटाच्या सेटवर प्रेम झाले आहे. आज आपण अभिनेता सुनील दत्त (sunil dutt)आणि अभिनेत्री नर्गिसबद्दल बोलणार आहोत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नर्गिस आणि सुनील दत्त प्रेमात पडले. पण फार कमी लोकांना माहित आहे की, सुनील दत्तच्या अगोदर नर्गिस अभिनेता राज कपूरच्या प्रेमात वेड्या होत्या. राज कपूर विवाहित होते, पण नर्गिसला ते इतके आवडायचे की, त्या त्यांची दुसरी पत्नी होण्यासही तयार होत्या. मग असे काय झाले की, नर्गिस यांनी सुनील दत्त यांचा हात धरला, तर आज आम्ही सांगणार आहोत की, असे काय झाले ज्यामुळे नर्गिसने राज कपूरला सोडून, सुनील दत्त यांचा हात धरला.

त्याकाळी नर्गिस आणि राज कपूर यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा जोर धरून होत्या. त्यावेळी राज कपूर यांचे लग्न झाले होते आणि नर्गिस यांना हे चांगलेच माहीत होते. नर्गिस यांना हे माहित असूनही त्यांनी आरके प्रॉडक्शनच्या सर्व चित्रपटांना साईन केले. राज कपूरची दुसरी पत्नी होण्यासाठीही त्या तयार झाल्या होत्या. पण राज कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडण्यास नकार दिला.

राज कपूरमुळे नर्गिस आता पूर्णपणे तुटल्या होत्या आणि त्या नैराश्यात गेल्या होत्या. यानंतर सुनील दत्त त्यांच्या आयुष्यात आले. तसे तर सुनील दत्त नर्गिसचे खूप चांगले मित्र होते, परंतु पहिल्या नजरेतच ते नर्गिसच्या प्रेमात पडले होते. मात्र, त्यांनी नर्गिसला हे कधीच सांगितले नव्हते.

असे म्हणतात की, सुनील दत्त जेव्हा सिलोन रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करत असायचे, तेव्हा पहिल्यांदा या दोघांची भेट झाली होती. इथेच त्यांना नर्गिसची मुलाखत घेण्याचे काम सोपविण्यात आले होते. अभिनेता सुनील दत्त यांचा त्यावेळी अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. त्याचवेळी, नर्गिस यशस्वी अभिनेत्री म्हणून लोकांच्या मनावर राज्य करत होत्या. सुनील दत्त यांनी जेव्हा पहिल्यांदा नर्गिसला पाहिले, तेव्हा ते त्यांना एक प्रश्नही विचारू शकले नाहीत. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची नोकरीही जाता जाता वाचली होती.

यानंतर सुनील दत्त आणि नर्गिस यांची भेट ‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या सेटवर झाली. मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटामध्ये सुनील दत्त आणि नर्गिस एकत्र काम करत होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक घटना घडली, ज्याने या दोघांना कायमचे एकमेकांच्या जवळ आणले.

‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या एक सीन शूट करण्यासाठी सेटवर आग लावण्यात आली होती. आग हळूहळू तीव्र झाली आणि नर्गिस त्या आगीत अडकल्या. सुनील दत्तने त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता, नर्गिसला वाचवण्यासाठी आगीत उडी मारली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. ते इतक्या वाईट प्रकारे जळाले गेले की, ते पुन्हा पुन्हा बेशुद्ध होऊ लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे नर्गिसने दिवस-रात्र त्यांची काळजी घेतली. या घटनेनंतर नर्गिस आणि सुनील दत्त यांनी एकमेकांना पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले.

त्यानंतर नर्गिस आणि सुनील दत्तचे 1958 साली लग्न झाले. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त अशी तीन मुले या जोडप्याला झाली. लग्नानंतर सुनील दत्त यांना एका मुलाखतीत विचारले गेले की, ते नर्गिसच्या प्रेमात कसे पडले. मग त्यांनी सांगितले की, मला त्या नेहमीच माणूस व बाई म्हणून अशा रूपात मिळाल्या, ज्यांना माझ्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी हे माहित आहे. मला माझ्या पत्नीमध्ये करुणा आणि समजूतदारपणा मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-़

हे देखील वाचा