Thursday, March 28, 2024

रणबीर आलियाच्या लग्नाची स्वप्ने बघत होते ऋषी कपूर, करायचं होतं ‘ग्रँड वेडिंग’; सुभाष घईंनी आठवल्या ‘त्या’ गप्पा

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) अखेर या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कलाकारांच्या घरी लग्नाची जोरात तयारी सुरू आहे (Ranbir Alia Wedding). मात्र, लग्न समारंभाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

दरम्यान, चित्रपट निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्याशी गप्पा मारलेला दिवस आठवला आहे. ऋषी मुलगा रणबीरचे लग्न डिसेंबर २०२० मध्ये करण्याचा विचार करत होते. हा सोहळा खूप भव्य होणार होता, पण त्याआधीच ३० एप्रिल २०२० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. (rishi kapoor was planning son grand wedding in december 2020)

चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी अलीकडेच रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी ऋषी कपूर यांच्याशी साधलेल्या संभाषणचे वर्णन केले, जे डिसेंबर २०२० साठी भव्यपणे प्लॅन केले जाणार होते. मात्र, त्याच वर्षी ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे कर्करोगामुळे निधन झाले.

मुलाच्या लग्नाची प्लॅनिंग करत होते ऋषी
सुभाष घई यांनी सांगितले की, “मला आठवते की जानेवारी २०२० मध्ये मी ऋषी कपूर यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. चांगले मित्र म्हणून आमची खूप वेळ चर्चा झाली. डिसेंबर २०२० मध्ये त्यांचा मुलगा रणबीरचे लग्न आलियाशी मोठ्या थाटात करायचे आहे हे सांगताना ते खूप आनंदी होते. पण ते आम्हा सर्वांना खूप दु:खात सोडून गेले.

‘लवकरच स्वप्न पूर्ण होईल’
सुभाष म्हणाले की, रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर ऋषीची स्वप्ने लवकरच पूर्ण होतील. ते म्हणाले, “आज मी खूप आनंदी आहे की, रणबीर आणि आलिया अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. ऋषी आणि नीतू कपूर यांच्यासाठी जसे मी नेहमी देत होतो, त्याचप्रमाणे मी या दोघांनाही सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो.”

रणबीर आणि आलियाने २०१७ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, जेव्हा दोघे अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर एकत्र काम करत होते. अशातच दोघे लवकरच या चित्रपटाद्वारे पहिल्यादाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 हेही वाचा

हे देखील वाचा