Saturday, April 20, 2024

सलमान खानचा पारा हाय! का दिली चिरंजीवींना ‘गॉडफादर’ सोडण्याची धमकी?

सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि साऊथचे मेगास्टार चिरंजीवी (Chirnjeevi) यांनी एका प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. ‘गॉडफादर’ या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने कोणतेही शुल्क घेतलेले नाही. आता सलमान खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

का चिडला सलमान खान?
सलमान खानने ‘गॉडफादर’ सोडण्याची धमकी दिल्याचे ऐकायला मिळत आहे. ही बातमी समोर येताच व्हायरल झाली. हा विचार करून चाहते अस्वस्थ झाले की, असे काय घडले ज्यामुळे भाईजानचा पारा चढला आणि त्याने चित्रपटातून वॉकआउट करण्याची धमकी दिली. चला तर मग सस्पेन्स संपवून जाणून घेऊया, की सलमानने निर्मात्यांना चित्रपट सोडण्याची धमकी का दिली. (what salman khan threatened to walk out of chiranjeevi film godfather reason)

‘गॉडफादर’मध्ये २० मिनिटांचा कॅमिओ
‘गॉडफादर’च्या शूटिंगदरम्यान आधी सांगितल्याप्रमाणे, निर्मात्यांनी सलमान खानला त्याच्या कॅमिओ भूमिकेसाठी २० कोटींची ऑफर दिली होती. ज्याला अभिनेत्याने नकार दिला. इथेच हा विषय संपला होता. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी सलमान खानला पुन्हा फी घेण्याची विनंती केली. त्यानंतर सलमान खानने निर्मात्यांना चित्रपट सोडण्याची धमकी दिली. आता सलमान खान तर सलमान आहे, एकदा कमिटमेंट केली की तो कोणाचेही ऐकत नाही. स्वतः चेही नाही.

सलमानने एकही पैसा न घेता चिरंजीवीच्या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानच्या या निर्णयाने चिरंजीवी आणि चित्रपटाच्या टीमला आश्चर्याचा धक्का बसला. सलमान आणि चिरंजीवी यांच्यातील बॉन्ड खूप खास आहे. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांच्या जवळचे मित्र आहेत. अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांच्या जवळचे मित्र आहेत. दोन्ही स्टार्स त्यांच्या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग हैदराबादमध्ये करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजा आहेत. तर नयनतारा या सिनेमात नायिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा