Tuesday, April 16, 2024

जेव्हा रागाच्या भरात सलमान खानने निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या अंगावर भिरकावली डायरी तेव्हा…

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडचे सर्व मोठे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते पाहुणे म्हणून येतात. या कार्यक्रमांत केवळ हास्य आणि विनोदच नाही तर बॉलिवूडच्या अशा अनेक गोष्टी आणि न ऐकलेले किस्सेही समोर आले आहेत. अशीच एक घटना निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी सांगितली आहे जेव्हा त्यांचे सलमान खानसोबत भांडण झाले होते. नक्की काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

अलीकडेच फिरोज नाडियाडवाला पत्नी वर्धा खान, टायगर श्रॉफ, क्रिती सेनन आणि अहान शेट्टीसोबत कपिल शर्माच्या कार्यक्रमात पोहोचले होते. या दरम्यान कपिल आणि आलेल्या पाहुण्यांच्यामध्ये चांगलीच धमाल पाहायला मिळाली. यावेळी फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितले की, “2000 मध्ये त्यांच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखांसाठी सलमान खानसोबत त्यांचा वाद झाला होता. वास्तविक त्यावेळी सलमान खान शाहरुख खानसोबत ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाचे शूटिंग करत होता.” याबद्दल बोलताना साजिद यांनी सांगितले की, “सलमान खान 5 महिन्यांनंतर चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार होता, परंतु मला त्याला फक्त 20 दिवसांत शूटिंग सुरू करायचे होते. या मुद्द्यावरून त्यांचा सलमान खानसोबत वाद झाला. साजिद म्हणाले की , ‘मी या चित्रपटासाठी दुसऱ्या कलाकाराला कास्ट केले होते आणि 20 दिवसांच्या शूटिंगनंतरही मला या चित्रपटाबाबत ठीक वाटत नव्हते. मला खुपच वाईट वाटत होते.”

sajid nadiyadwala

ते पुढे बोलताना म्हणाले की, “त्यांच्या बोलण्यावर सलमान खान म्हणाला, ‘तू वेडा झाला आहेस का? माझ्या तारखा भरल्या आहेत. मी सध्या ४ चित्रपट करत आहे.” साजिद पुढे म्हणाला, “म्हणून आमच्यात या विषयावर वाद सुरू झाला. यानंतर रागाच्या भरात सलमानने त्याची डायरी माझ्याकडे फेकली आणि म्हणाला- बघ, तारीख नाही. मी डायरी घेतली आणि त्याची तारखा जुळवल्या. मी त्याच्या डायरीत असलेल्या वेळापत्रकात बदल करत मला पाहिजे तशा तारखा जुळविल्या आणि त्यात माझ्या तारखा टाकल्या. ३ दिवसांनी त्याचा कामगार राजू माझ्याकडे आला आणि त्याची डायरी घेऊन गेला. सलमानला शूटला जायचे आहे पण कुठे जायचे हे कळत नसल्याने मी डायरी परत करावी, असेही तो म्हणाला. त्यामुळे तीन महिन्यांत काही तारखांमध्ये बदल करून आम्ही हा चित्रपट तयार केला.”

दरम्यान अभिनेता सलमान खानने “हर दिल जो प्यार करेगा” या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुंवर यांनी केले होते. सलमान खान सोबत चित्रपटात राणी मुखर्जीसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकली होती. सलमान आणि साजिद खान यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच हा एक चित्रपट होता.

हे देखील वाचा