बॉलिवूडमधील कॉमेडीचा बादशाह असे ज्याला संबोधले जाते तो म्हणजे कपिल शर्मा. आज लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळे त्याला ओळखतात. त्याने घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या या यशामागचे कारण म्हणजे गेल्या 15 वर्षापासून त्यानी केलेली मेहनत. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ यामधून त्यानेे सगळ्यांना आपलेसे करून घेतले आहे. आज त्याचे नाव अनेक यशस्वी कलाकारांमध्ये आवर्जुन घेतले जातेे.
पण एक काळ असा होता की त्याच्याकडे त्याच्या बहिणीचे लग्न करण्यासाठी देखील पैसे नव्हते. परंतु वेळ बदलली आणि त्याने केवळ त्याच्या बहिणीचे लग्न धूम धडाक्यात लावले नाही, तर इंडस्ट्रीमध्ये त्याचे एक वेगळेच स्थानही निर्माण केले.
कपिल शर्माने त्याच्या बहिणीच्या लग्नाचा किस्सा शेअर करताना सांगितले की, “2007 मध्ये माझ्या बहिणीचे लग्न ठरले हो, तेव्हा बहिणीच्या होणाऱ्या सासूने सांगितले होते की लग्नाच्या आधी साखरपुडा झाला पाहिजे. त्यासाठी अंगठी लागत होती. त्यावेळी बहिणीच्या लग्नासाठी आम्ही जवळपास आम्ही 6 लाख रुपये जमा केले होते. परंतु वडिलांच्या आजारपणात 4 लाख रुपये खर्च झाले. त्यावेळी राहिलेल्या 2 लाखांमध्ये अंगठी आणि लग्न कसे करायचे हा आमच्या पुढचा मोठा प्रश्न होता.”
माध्यमांच्या माहितीनुसार, 2007 साली ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोने कपिलचे आयुष्य बदलले. त्याने हा शो जिंकला होता. या शोमध्ये त्याने 10 लाख रुपये एवढी रक्कम जिंकली होती. त्यानंतर त्याने त्याच्या बहिणीला फोन केला आणि सांगितले की, अंगठी खरेदी करायला जा. यानंतर त्याने अनेक शो जिंकले होते. त्यात त्याने 30 लाख रुपये जिंकले होते आणि यातून त्याच्या बहिनीचे लग्न केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टीसोबत रोमँटिक सीन देऊन चर्चेत आलेली काजलची चुलत बहीण आज कुठंय?
-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग