मालिका, चित्रपटांमध्ये आपण अतिशय मस्त आणि स्वप्नवत अशा प्रेमकहाण्या बघत असतो. ते पाहून कधीतरी आपल्या मनातही आपली अशीच एक प्रेमकहाणी असावी असा विचार नक्कीच येऊन जातो. पण काही नशीबवान लोकांच्या आयुष्यात चित्रपटांसारखी प्रेमकहाणी नक्कीच असते. मनोरंजनविश्वात देखील असे काही नशीबवान लोकं आहेत त्यांच्या प्रेमकहाण्या चित्रपट मालिकांमधील प्रेमकहाण्यांना देखील मागे टाकतील. आता अभिनेत्री अदिती शर्माचेच घ्या. सध्या अदिती आपल्याला सोनी चॅनल वरच्या ‘कथा अनकही’ या मालिकेत मुख्य भूमिका बजावताना दिसत आहे. या भूमिकेसाठी तिचे खूपच जास्त कौतुक होत असून, मालिकेला खूप कमी वेळेत लोकांनी डोक्यावर घेतले आहे.
View this post on Instagram
‘कथा अनकही’ या मालिकेत अदितीने अतिशय मजबूत, महत्वाकांक्षी, स्वावलंबी, स्वाभिमानी आईची भूमिका साकारली आहे. जवळपास तीन वर्षांनी अदिती या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे तिचे फॅन्स चांगलेच खुश आहेत. तिने तिच्या अभिनयाने, निरागसतेने, सुंदरतेने सर्वांचीच मने जिंकली आहेत. अदितीच्या सर्व मालिकांमधील तिच्या कहाण्या हिट राहिल्या अशीच तिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील तिची प्रेमकहाणी खूपच मस्त आणि हटके आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला तिच्या प्रेमकहाणीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
अदिती शर्माची २००४ साली पहिल्यांदा तिचा नवरा असलेल्या टीव्ही अभिनेता असलेल्या सरवर आहुजाला पहिले. सरवरला ‘ज्योती’ या भूमिकेसाठी ओळखले जाते. सरवर आणि अदिती यांची पहिली भेट टीव्ही शो असलेल्या ‘झी सिनेस्टार की खोज’ यादरम्यान झाली. खास गोष्ट म्हणजे ते दोघं या शोमध्ये वेगवेगळ्या पार्टनरसोबत आले होते, मात्र पुढे शो मध्ये त्यांनी दोघांनी मिळून ट्रॉफी जिंकली.
View this post on Instagram
शोमध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर सरवर आहुजा अनेक चित्रपटांमध्ये दिसला. त्याने ‘खन्ना और अय्यर’ आणि ‘कुछ खट्टा कुछ मीठा’ सिनेमात काम केले. अदिती आणि सरवरने २००४ साली डेटिंगला सुरुवात केली. मात्र त्यांच्या या रिलेशशीपची माहिती कोणालाच नव्हती. कामात व्यस्त असूनही ते एकमेकांसाठी वेळ काढायचे. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१४ साली लग्न केले. २०१९ साली ते सरताज नावाच्या मुलाचे आईबाबा झाले.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद काही थांबेना, आता थेट महिला आयाेगाकडून चित्रा वाघ यांना नाेटीस