दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांनी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ सारखे गँगस्टर चित्रपट बनवले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले आणि त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये एक दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख मिळाली. बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या लोकांनाही त्यांचे चित्रपट आवडले का? आणि राम गोपाल वर्मा दाऊद इब्राहिमला श्रेय देण्याचा आग्रह का धरतात?
फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी खुलासा केला की, त्यांना त्यांचे ‘गन्स अँड थाइज’ हे आत्मचरित्र दाऊद इब्राहिमला समर्पित करायचे होते, परंतु प्रकाशकांनी आक्षेप घेतला आणि ते नाव काढून टाकले. “मी माझे आत्मचरित्र दाऊद इब्राहिमला समर्पित केले होते, पण प्रकाशकांनी ते नाव काढून टाकले,” असे ते म्हणाले. “जर दाऊद इब्राहिम नसता, तर मी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’सारखे दोन अजरामर चित्रपट बनवले नसते. मी हे पुस्तक त्याला का समर्पित करू नये? त्याच्यामुळेच माझी उपजीविका चालते.”
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांना अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असत. राम गोपाल वर्मा यांच्या बाबतीतही असेच घडले का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणतात, “मी एकमेव असा व्यक्ती होतो, ज्याला कधीही धमकीचे फोन आले नाहीत. याचे कारण असे की, त्यांना ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ हे चित्रपट खूप आवडत होते. त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता. एक प्रकारे, मी त्यांचा जिवाभावाचा सोबतीच झालो होतो.”
चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या लोकप्रिय राजकीय-गुन्हेगारी चित्रपट मालिका ‘सरकार’च्या सिक्वेलची घोषणा केली आहे, ज्याचे नाव ‘सरकार ४’ आहे. दिग्दर्शकाने सांगितले की, या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


