Friday, March 29, 2024

ते खरोखर पाण्यात बुडायला लागले, लोकांना वाटले अभिनय करतायेत, आशिष विद्यार्थी यांच्या जिवावर बेतलेला प्रसंग

कोणताही चित्रपट असो तो सुपरहीट करण्यात चित्रपटाच्या नायका इतकाच खलनायकाचाही मोलाचा वाटा असतो. चित्रपटात फक्त नायकाच्याच भूमिका गाजतात असेही नाही. अनेक चित्रपटातातील हिरोंपेक्षा खलनायकाच्या भूमिकाच प्रचंड गाजलेल्या आहेत. बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिने जगतातही अनेक असे खलनायक आहेत ज्यांनी आपल्या नकारात्मक भूमिका साकारुनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक खलनायक म्हणजे आशिष विद्यार्थी (ashish vidyarthi) .  आपल्या नकारात्मक भूमिका साकारुनही त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या असाच एक किस्सा प्रचंड गाजला होता. ज्यामध्ये ते मरता मरता वाचले होते. काय आहा किस्सा चला जाणून घेऊ. 

आशिष विद्यार्थी यांच्या करारी आवाजाने, दमदार अभिनयामुळे अनेक खलनायकी भूमिका गाजल्या आहेत. कन्नड भाषेतील चित्रपटांमधून चित्रपट प्रवास सुरू केल्यानंतर त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये आपली कीर्ती पसरवली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यांच्या सर्वच चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येक चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत दिसले. त्याचवेळी प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिले.

त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, ते एकदा आपल्या भूमिकेत गेले की त्यांना बाकी कशाचच भान राहत नव्हते. आपल्या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी ते प्रचंड मेहनत घ्यायचे. याच कारणांमुळे एकदा त्यांचा जीव जाता जाता वाचला होता.  एकदा ते एका चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्यांना पाण्यात बुडण्याचे नाटक करावे लागत होते. असे काही घडले की ते पाण्यात उतरले,पाणी खूप खोल होते, ज्यामुळे ते खरोखर पाण्यात बुडू लागले. असे असतानाही त्यांचा जीव वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते कारण ते अभिनय करत आहेत असेच सर्वांना वाटत होते. मात्र  तेथे उपस्थित असलेल्या एका पोलिसाला हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर त्याने त्यांचे प्राण वाचवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा