Saturday, July 27, 2024

‘शेवंता’ नाम काफी नहीं होता, म्हणत अपूर्वाने सांगितले ‘रात्रीस खेळ चाले’ सोडण्यामागील कारण

आपल्याला नेहमीच कलाकार आणि त्यांचे आयुष्य आकर्षित करत असते. प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर असलेले कलाकार प्रेक्षकांवर नेहमीच त्यांची छाप सोडतात. मात्र सामान्य लोकं जशा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात काही समस्यांना सामोरे जातात याला कलाकार देखील अपवाद नाही. कलाकरांना देखील त्यांच्या कामाच्या ठिकाणी विविध चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. कधीकधी हे अनुभव कलाकार सर्वांसमोर मांडतात तर कधी नाही. सर्वांचीच आवडती असणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका वागल्यास कारणामुळे गाजताना दिसत आहे. या मालिकेतून सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध पात्र असणारी शेवंता अर्थात अपूर्व नेमळेकरने एक्सिट घेतली आहे. तिने ही मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. अपूर्वाने इंस्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहिले असून, यात तिने मालिकेत तिला तिच्या वजनावरून कसे बोलले जात होते. आई इतर अनेक मुद्दे मांडले आहेत.

अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “‘शेवंता’, बस नाम ही काफी है, पर कभी कभी ये इतनाही काफी नही होता”

‘”शेवंता’ म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर ‘शेवंता’चे सादरीकरण हे मला सहज जमत गेले. जणू काही मीच ती ‘शेवंता’ अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य, त्या व्यक्ती रेखेतील विविध पैल, निर-निराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘शेवंता’ ही अजरामर झाली. ‘शेवंता’ची भूमिका मला खूप काही देऊन गेली.”

“असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी ‘शेवंता’च्या भूमिकेचा त्याग का केला? असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत, ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याच उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. या गोष्टीचा उलगडा करणे हे माझे कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.”

पुढे अपूर्वाने लिहिले, “”शेवंता’ या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही नेगिटिव्ह कमेंट्स आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी त्यावर कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.”

“तुम्हाला माहितीच आहे की ‘रात्रीस खेळ चालेचं शूटींग हे सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईवरुन १२ तासाचा ट्रेनने प्रवास करुन जात होते. मला शूटींग करता बोलवल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करुन नंतर ३-४ दिवस काहीच शूट केलं जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ ६ ते ७ दिवसच काम लागत होतं आणि त्याकरिता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.”

पुढे अपूर्वाने तिच्या चेकबद्दल आणि अडकलेल्या पैशांबाबदल लिहिले. ““प्रोडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी आम्हाला तुमचे ५ ते ६ दिवसच लागणार आहे. म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु ५ ते ६ महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे. असाच प्रकार गेल्यावर्षी ‘झी युवा’वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही,असं आश्वासन दिले गेले होतं. अद्याप पर्यंत तो चेक मिळाला नाही आणि ते आश्वासनसुद्धा पाळलं गेलं नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल, माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथे होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतातून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबले नाही. आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहिन आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे.”

अपूर्वा सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अपूर्वाला ‘शेवंता’ या भूमिकेने तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा