Sunday, May 19, 2024

‘या’ कारणामुळे शाहरुखने आपल्या लाडक्याचे नाव ठेवले होते ‘आर्यन’, मुलीशी आहे कनेक्शन

वादाच्या भोवऱ्यात अडकायला कुणाला आवडतं? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रत्येकजण म्हणेल की, कोणालाच नाही. असेच काही बॉलिवूड कलाकारांबाबतही आहे. कदाचित त्याच कलाकारांमधील एक म्हणजे सुपरस्टार शाहरुख खान होय. शाहरुख वादापासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. मात्र, त्याला तरी कुठे माहिती होतं की, त्याच्याच मुलाला एकेदिवशी तुरुंगाची हवा खावी लागेल. खरं तर, आर्यनला २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधील रेव्ह पार्टीतून एनसीबीने १७ लोकांसह ताब्यात घेतले होते. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आर्यनच्या जामीनावर बुधवारी (२० ऑक्टोबर) सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला आहे. अशामध्ये आर्यनच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यामुळे शाहरुख आणि गौरी सध्या चिंतेत आहेत.

शाहरुखने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो आपल्या पत्नीनंतर सर्वात जास्त कुणावर प्रेम करत असेल, तर ते म्हणजे त्याच्या मुलांवर. तुम्हाला माहिती आहे का, शाहरुखने आपल्या मुलाचे नाव आर्यनच का ठेवले? नाही, तर  आज आपण या लेखातून शाहरुख आणि आर्यनच्या आयुष्याशी निगडीत काही किस्से जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया… (Aryan Khan Drugs Case Actor Shahrukh Khan Named His Son Aryan Because of This Reason)

७ वर्षांनंतर झाला होता आर्यन
शाहरुख आणि गौरी २५ ऑक्टोबर, १९९१ रोजी विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या तब्बल ७ वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला होता. त्याचे नाव त्यांनी आर्यन ठेवले. आर्यन नाव ठेवण्यामागेल कोणत्याही ज्योतिषी विद्येचा हात नव्हता, तर याचा संबंध मुलींशी होता.

‘या’ कारणामुळे ठेवले ‘आर्यन’ नाव
शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आर्यनचा हा लूक आम्हा दोघांपासून आला आहे. मी विचार केला की, आपल्या मुलाला आर्यन नाव दिले पाहिजे. मला केवळ नावाचा आवाज आवडला होता. मी विचार केला, जेव्हा तो एखाद्या मुलीला सांगेल की, ‘माझे नाव आर्यन आहे’, आर्यन खान… तेव्हा ते ऐकायला चांगले वाटेल.”

आर्यनच्या जन्मावेळी काय विचार करत होता शाहरुख?
एका चॅट शोमध्ये शाहरुखने खुलासा केला होता की, “आर्यनच्या जन्मावेळी मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होता की, मी दोघांच्याही जवळ नाहीये. फक्त डोक्यात एकच गोष्ट सुरू होती की, गौरी व्यवस्थित असावी, तिला काहीच होऊ नये. जेव्हा दोघांनाही पाहिले, तेव्हा बरे वाटले होते.”

आर्यन २ ऑक्टोबरपासून भोगतोय शिक्षा
२ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरू असलेल्या अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यनला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतरपासून तो तुरुंगात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग! न्यायालयाने फेटाळला आर्यनचा जामीन; शाहरुखचा मुलगा राहणार तुरुंगातच

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

-क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

हे देखील वाचा