बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच वेळी, असेही काही स्टार्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत एकतर खूप कमी काम केले आहे किंवा अजिबात केलेच नाही. असेच दाेन कलाकार म्हणजे लाेकप्रिय अभिनेता शाहरुख खान आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार. यादाेघांनी फारच कमी चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘दिल तो पागल है‘मध्ये अक्षय कुमार गेस्ट अपीरियंस म्हणून दिसला हाेता. मात्र, त्यानंतर ताे कधीही शाहरुख साेबत चित्रपटात दिसला नाही. चाहत्यांची या दोन्ही स्टार्सला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा आहे, परंतु आतापर्यंत ते शक्य झाले नाही. यासंबधित शाहरुखला एका मुलाखतीत विचारले असता त्यानी एक रंजक किस्सा सांगितला. काय आहे ताे किस्सा? चला जाणून घेऊया…
तर झाले असे की, एकदा मुलाखतीदरम्यान शाहरुख खान (shah rukh khan)याल अक्षयसाेबत चित्रपट करण्याबाबत विचारले असता त्याने त्याच्याच शैलीत मजेशीर उत्तर दिले. शाहरुख म्हणाला, “आमची वेळ जुळत नसल्याने तो त्याच्यासाेबत काम करू शकत नाही.” आपला मुद्दा पुढे करत शाहरुख म्हणाला, “मी काय बोलू? मी त्यांच्याप्रमाणे लवकर उठत नाही. जेव्हा तो उठणार असतो तेव्हा मी झोपायला जातो. त्याचा दिवस लवकर सुरू होतो. मी काम सुरू केल्यावर तो पॅकअप करून घरी जातो. मी एक निशाचर व्यक्ती आहे. माझ्याप्रमाणे इतर लोकांना रात्री काम करण्याची सवय नाही.”
View this post on Instagram
यादरम्यान त्याने पुढे सांगितले होते की, “जर तो अक्षयसोबत काम करणार असेल, तर दोघेही सेटवर कधीच भेटणार नाहीत.” शाहरुख म्हणाला, “मला त्याच्यासोबत काम करायचे आहे, पण आमची वेळ कधीच जुळणार नाही.”
शाहरुख खान याच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘दिल ताे पागल है’, ‘कुछ कुछ हाेता है’, ‘ओम शांती ओम’, ‘कभी खुशी कभी गम’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor shah rukh khan told the reason why can never work with akshay kumar)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘लाईव्ह रेकॉर्डिंगसाठी…’, उषा उथ्थुप यांनी सांगितला 40 वर्षा पुर्वीचा रंजक किस्सा
‘पठाण चित्रपटातून वाद निर्माण होणारे आउटफीटवाले सीन काढून टाका नाही, तर…’,एमपी गृहमंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य