Thursday, March 28, 2024

घटस्फोटाच्या अनेक महिन्यांनंतर धनुषने ऐश्वर्यासाठी केलं ट्वीट, तर पत्नीकडून मिळालं ‘असं’ उत्तर

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्याने (Aishwarya Rajinikanth) काही काळापूर्वी पती धनुषपासून (Dhanush) वेगळे होण्याची घोषणा केली होती. दोन्ही कलाकारांच्या विभक्त होण्याने चाहत्यांचे बरेच निराश झाले होते. हे जोडपे एकमेकांपासून कधी वेगळे होऊ शकेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मात्र, घटस्फोटानंतरही दोघांचे नाते खूप चांगले आहे. अशातच आता धनुषने माजी पत्नी ऐश्वर्याबद्दल असे ट्वीट केले आहे, ज्याची जोरदार चर्चा होत आहे.

धनुषच्या ट्वीटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्या त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. नुकतेच ऐश्वर्याचे ‘पयानी’ हे गाणे रिलीझ झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत धनुषने ट्वीटमध्ये ऐश्वर्याला गाण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी लिहिले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धनुषने ट्वीट करून लिहिले की, “पयानी गाण्यासाठी तुला खूप शुभेच्छा माझी मैत्रिण ऐश्वर्या.” महत्त्वाचे म्हणजे. धनुषने ऐश्वर्याला त्याची मैत्रीण संबोधले आहे. धनुषच्या या ट्वीटवर ऐश्वर्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटला उत्तर देताना तिने लिहिले, “धन्यवाद धनुष.” (dhanush ex wife aishwaryaa rajinikanth responds as he calls her friend read details here)

वेगळे होण्याची केली होती घोषणा
धनुषने या वर्षी जानेवारीमध्ये ट्विटरवर एका पोस्टमध्ये पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते, “१८ वर्षे एकत्र राहिलो. ज्यामध्ये आम्ही मित्र, जोडपे आणि पालक म्हणून एकत्र होतो. या प्रवासात आम्ही खूप काही पाहिलं. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता जोडपे म्हणून वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला गोपनीयता द्या.” ऐश्वर्यानेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती.

१८ वर्षांपूर्वी बांधली होती रेशीमगाठ
जेव्हा धनुषने ऐश्वर्यासोबत सात फेरे घेतले, त्यावेळी तो केवळ २१ वर्षांचा होता आणि ऐश्वर्या २३ वर्षांची होती. दोघांचे लग्न तामिळ रितीरिवाजांनुसार झाले होते. या दोघांना दोन मुले असून, एकाचे नाव यात्रा राजा आणि दुसरे नाव लिंगा राजा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष आणि ऐश्वर्याची भेट ‘कदल कोंडाएं’ चित्रपटादरम्यान झाली होती. सिनेमाच्या मालकाने ऐश्वर्याची धनुषशी ओळख करून दिली आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल ऐश्वर्याने त्याचे अभिनंदन केले. यानंतर दुसऱ्या दिवशी धनुषला ऐश्वर्याकडून पुष्पगुच्छ देण्यात आला. ऐश्वर्याची ही गोष्ट धनुषला खूप आवडली आणि नंतर दोघेही मित्र झाले. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर १८ नोव्हेंबर २९००४ रोजी दोघांनी सात फेरे घेतले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा