Tuesday, April 16, 2024

Kabhi Eid Kabhi Diwali | ‘हे’ कारण देत मेहुणा आयुष शर्माने सलमान खानच्या चित्रपटातून घेतला काढता पाय

सलमान खानचा (Salman Khan) ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही काळापूर्वी सुरू झाले असून, काही दिवसांतच हा चित्रपट त्याच्या स्टारकास्टमुळे प्रसिद्धीझोतात आला. नुकतीच माहिती समोर आली आहे की, आयुष शर्माने (Ayush Sharma) सलमान खानचा हा चित्रपट सोडला आहे. इतकेच नाही, तर अभिनेता झहीर इक्बाल (Zahir Iqbal) देखील या चित्रपटाचा भाग राहणार नाही. त्यानंतर निर्माते आता या दोन अभिनेत्यांच्या बदलीचा शोधात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानचा मेहुणा आयुष शर्मा क्रिएटिव्ह मतभेदांचे कारण देत प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. आयुषच्या या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयुषसोबत झहीर इक्बाल देखील या चित्रपटाचा भाग नाही. त्यामुळे आता निर्मात्यांनी या दोन अभिनेत्यांच्या जागी दुसऱ्या कलाकारांचा शोध सुरू केला आहे. तसेच आता दोन अभिनेत्यांची नावेही समोर येत आहेत, जे आयुष आणि झहीरची जागा घेऊ शकतात. (Ayush sharma leave kabhi eid kabhi diwali movie know reason)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री भाग्यश्रीचा (Bhagyashree) मुलगा अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) या चित्रपटात सहभागी होऊ शकतो. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अभिमन्यूशी संपर्क साधला आहे. अभिमन्यूशिवाय जावेद जाफरी (Javed Jafri) यांचा मुलगा मीझान जाफरीचे (Meezan Jafri) नावही समोर येत आहे. मात्र, आतापर्यंत निर्माते आणि या दोन्ही कलाकारांकडून याबाबत काहीही अधिकृत करण्यात आलेले नाही.

सलमान खानचा चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ ३१ डिसेंबरला रिलीझ होणार आहे. ज्यामध्ये सलमानसोबत पूजा हेगडे (Pooja Hegde), शहनाज गिल (Shehnaz Gill), राघव जुयाल (Raghav Juyal) आणि तेलुगू अभिनेता व्यंकटेश दग्गुबती (Vyankatesh Daggubati) दिसणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील एका खास सेटवर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा