Tuesday, June 24, 2025
Home टेलिव्हिजन The Kapil Sharma Show | सुनील ग्रोव्हरपासून ते उपासना सिंगपर्यंत, ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी का सोडला शो?

The Kapil Sharma Show | सुनील ग्रोव्हरपासून ते उपासना सिंगपर्यंत, ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी का सोडला शो?

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (kapil sharma) कार्यक्रमाची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. या कार्यक्रमात येणारे कलाकार आणि त्यांच्यात झालेली धमाल नेहमीच पाहण्यासारखी असते. कपिल शर्माच्या विनोदी शैलीची, अचूक टायमिंगचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. मात्र हा कार्यक्रम जितका चांगल्या गोष्टीसाठी गाजला तितकाच तो कपिल शर्माच्या सह कलाकारांसोबत वागण्याने आणि वादानेही चर्चेत राहिला आहे. कारण यशाच्या शिखरावर असतानाच कपिल शर्माच्या वागण्यामुळे अनेक कलाकारांनी हा कार्यक्रम सोडल्याने सगळीकडे चर्चा रंगली होती. काही काळ कपिल शर्माला हा कार्यक्रम बंदही होते. आज पाहूया कोण आहेत ते कलाकार, ज्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला होता.

सुनील ग्रोव्हर (Sunil Grover)
कपिल शर्माच्या कार्यक्रमात सगळ्यात गाजलेला अभिनेता म्हणजे सुनिल ग्रोवर. सुनिल ग्रोवरची डॉ. मशहुर गुलाटीच्या भूमिकेने सगळ्यांना वेड लावले होते. याच काळात हा कार्यक्रम जोरदार यशस्वी ठरला होता. मात्र २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन येताना विमानात कपिल शर्मा आणि सुनीलमध्ये जोरदार वाद झाला होता. यावेळी कपिल शर्माने सुनिलला मारहाण केली होती. याच वादानंतर सुनिल ग्रोवरने  हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय  घेतला होता.

उपासना सिंग (Upasana Singh)
कपिल शर्माच्या कार्यक्रमात उपासना सिंगच्या भूमिकेचे आणि पात्राचे सगळ्यांनी कौतुक केले होते. मात्र तिनेही हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांना धक्का दिला होता. निर्णयाबद्दल विचारले असता तिने, ‘या कार्यक्रमात काही मिनिटांची भूमिका करण्यापेक्षा दुसरे काम केलेले चांगले’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra)
कपिल शर्माच्या कार्यक्रमात सुगंधा मिश्राच्या केसांच्या स्टाइलची आणि शिक्षिकेच्या भूमिकेतील तिच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली होती. मात्र तिनेही या कार्यक्रमातून काढता पाय घेत सगळ्यांना चकित केले होते. याबद्दल तिने सुनिल ग्रोवर यांच्याशी झालेल्या वादाचे कारण दिले होते.

नवज्योतसिंग सिद्धु (Navjyotsingh Siddhu)
कपिल शर्माच्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त चर्चा नवज्योतसिंग सिद्धु यांची झाली होती. आपल्या मिश्किल स्वभावाने  आणि शायरीने त्यांनी या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर त्यांच्या एका वक्तव्याने मोठा वाद झाला होता. ज्यामुळे या कार्यक्रमातून त्यांना हटवण्याची मागणी झाली होती. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमातुन बाहेर काढण्यात आले होते.

भारती सिंग (Bharati Singh)
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगनेही या कार्यक्रमात आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच धमाल केली होती. मात्र इतर कार्यक्रमांचे कारण देत तिनेही या कार्यक्रमातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा –

हे देखील वाचा