सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित अं’मली पदार्थ प्रकरणातील आरोपी क्षितिज रवी प्रसाद सध्या जामिनावर बाहेर आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता असलेल्या क्षितिजला एनडीपीएस कोर्टातून दोन वर्षांसाठी जामीन मिळाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातून आपली निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली आहे. क्षितिज रवी प्रसाद याने सांगितले की, त्याने आयुष्यात कधीही अं’मली पदार्थांचे सेवन केले नाही किंवा अशा कोणत्याही कृत्याशी त्याचा संबंध नाही.
क्षितिज रवी प्रसादला NDPS न्यायालयाने नोव्हेंबर २०२० मध्ये जामीन मंजूर केला होता. यानंतर, गेल्या वर्षी तो प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्याने परदेशात जाण्यासाठी अर्ज केला होता. क्षितिज रवि प्रसाद १७ ते २४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान केनिया दौऱ्यावर होते. क्षितिज रवी प्रसादने आता या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यासाठी न्यायालयाला दिलेल्या अर्जात या खटल्याच्या तपासात त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे म्हटले आहे. (sushant singh rajput drugs case kshitij prasad seeks discharge)
या प्रकरणात क्षितिज प्रसादचे नाव कसे आले?
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अं’मली पदार्थ प्रकरणात क्षितिज रवि प्रसादचे नाव समोर आले, जेव्हा आफ्रिकन नागरिक अगिसिलाओस डेमेट्रिएड्सने एनसीबीच्या चौकशीत त्याचा उल्लेख केला. यानंतर एनसीबीने २६ सप्टेंबर २०२० रोजी क्षितिज रवी प्रसादला अटक केली.
नुकतेच एनसीबीने आरोपपत्रही दाखल केले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसोबत (Rhea Chakraborty) तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचेही नाव आहे. दुसरीकडे, सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी यालाही याच महिन्यात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सिद्धार्थ ४०३ दिवस तुरुंगात होता. त्याला २८ मे २०२१ रोजी एनसीबीने अटक केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा